पाठ 2
येशूला वधस्तंभावर का मरावे लागले?
या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय, देवाच्या चांगल्या बातमीला अर्थ नाही.
का हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवाचे उत्तर ऐकणे. देव म्हणतो की त्याने स्वेच्छेने आपले जीवन अनुभवणे आणि नंतर आपल्यासाठी मरणे निवडले जेणेकरून आपण पापापासून मुक्त होऊ शकू, जेणेकरून आपला त्याच्याशी समेट होऊ शकेल, आणि जेणेकरून तो आपली प्रीती व समर्पण जिंकू शकेल.
त्याने असे का केले? कारण ही त्याची निवड होती.
देव म्हणतो की जीवन रक्तामध्ये आहे. क्षमा तेव्हाच शक्य आहे जेव्हा शुद्ध रक्त सांडले जाते, आणि केवळ शुद्ध रक्तच अंतहीन जीवन देऊ शकते कारण ते मृत्यूच्या शापाखाली नाही. म्हणूनच येशूने, जो एकमात्र खरोखर शुद्ध मनुष्य, स्वेच्छेने आपल्यासाठी मरणे निवडले.
देवाने संपूर्ण इतिहासात अभिवचन दिले की तो आपल्यासाठी मरेल. जेव्हा येशूने भविष्यवाणी पूर्ण केली, तेव्हा त्याने देवाची अभिवचने खरी आणि विश्वासार्ह असल्याचे दाखवून दिले. अशा रीतीने येशूने त्याच्या जन्माच्या खूप आधी लिहिलेल्या 300 हून अधिक भविष्यवाण्या पूर्ण केल्या.
चला तर मरणासाठीची निवड करून येशूने काय साध्य केले याची यादी पाहू या.
- तो आपल्याला देवाकडे आणण्यासाठी मरण पावला.
- त्याच्या आत्म्याने आपल्याला जीवन दिले. जेव्हा आपण आपल्या वाईटामुळे मरतो, तेव्हा त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला जिवंत केले जाते.
- आपल्या पापासाठी त्याला फटके बसले, आणि त्याच्या शिक्षेमुळे आपल्याला शांती आणि आरोग्य प्राप्त होतात.
- त्याच्या आज्ञापालनाने भविष्यवाणी पूर्ण झाली.
- जेव्हा त्याला वधस्तंभावर खिळले गेले तेव्हा त्याने देवाचे ऋण फेडले, देवाच्या न्यायीपणाचे समाधान केले.
- आपले स्वागत करता यावे म्हणून त्याचा त्याग करण्यात आला.
- त्याने त्याचे जीवन स्वेच्छेने दिले जेणेकरून आपण त्याचे जीवन प्राप्त करू शकू. अशा प्रकारे त्याने जीवनाची देवाणघेवाण केली — आपल्या बद्ल्यात त्याचे.
- ज्या सेवकपणासाठी आणि निस्वार्थतेसाठी त्याने आपल्याला बोलावले आहे त्याने त्याचे उदाहरण स्थापित केले, जगाला शुद्ध करत असताना.
- त्याने आपला शाप झाडावर टांगून स्वतःवर घेतला जेणेकरून आपण वाईटाच्या गुलामगिरीच्या शापापासून मुक्त होऊ शकू.
- आदामाने जे भंग केले होते, ते त्याने जोडले. आदाम, निर्माण केलेला पहिला मानव, वाईट इच्छांरहित जन्मला होता, परंतु त्याच्या वाईट कृत्यांमुळे जगामध्ये मृत्यू आला. येशूचा जन्म वाईट इच्छांरहित झाला होता, परंतु त्याच्या पापरहित, स्वेच्छा मृत्यूने जगाला जीवन मिळाले.
- तो आदी आणि अंत आहे, त्यामुळे सर्व जीवन त्याच्यामध्येच आहे.
- त्याने मरणाची चव चाखली जेणेकरून आपण जीवनाचा आस्वाद घेऊ शकू. त्याला असे करण्याची गरज नसली तरी, त्याच्याकडे सर्व गोष्टींवर अधिकार आहे हे दाखवण्यासाठी त्याने सर्वकाही अनुभवले.
- तो सर्वात मोठा सेवक होता, ज्यांनी त्याचा द्वेष केला त्यांच्यासाठी त्याने त्याचा प्राण दिला. यामध्ये, तो इतर कोणत्याही कृतीपेक्षा त्याची प्रीती अधिक खोलवर दाखवतो.
- त्याच्या परिपूर्ण रक्ताने आपले आजार बरे होतात आणि आपल्याला न संपणारे जीवन मिळते.
किती उल्लेखनीय कामगिरी आणि अभिवचने आहेत! त्यांचा आपल्यासाठी काय अर्थ आहे?
देव म्हणतो की जेव्हा आपण भरवसा ठेवतो की येशू मरण पावला आणि आपल्यासाठी सर्व काही साध्य केले, तेव्हा आपल्याला त्याने मिळवलेली बक्षिसे अनुभवायला मिळतात. येशूने आपल्या वरील शाप घेतला जेणेकरून आपण वाईटाच्या शापापासून मुक्त होऊ. हे अभिवचन आपल्याला आत्मविश्वास देते की जेव्हा आपण त्याच्यामध्ये आपले जीवन आणि आनंद प्राप्त करतो, तेव्हा तो आपल्याला वाईट गोष्टींमध्ये गुंतण्याऐवजी त्याच्यावर प्रीती करण्यास आणि त्याचे आज्ञापालन करण्यास सामर्थ्य देतो.
ज्या वाईट सवयींना आपण पूर्वी सोडून देऊ शकलो नाही त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला हताश होण्याची गरज नाही. देवाने आपल्याला शुद्ध म्हणून पाहावे म्हणून येशूने आमचे कर्ज फेडले. हे अभिवचन आपल्याला आत्मविश्वास देते की कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवू शकत नाही.
आपल्या कृतीं द्वारे नव्हे तर देवाच्या कृपेने आपले तारण झाले आहे, म्हणून आपण आपल्या स्वतःच्या क्षमतेचा अभिमान बाळगू शकत नाही. तरीही, आपल्या जीवनात होणारा बदल हा देवावरील आपला भरवसा आणि त्याच्यावरील प्रीती खरे असल्याची पुष्टी करतो. उदाहरणार्थ, जर एखादा पुरुष म्हणतो की त्याची त्याच्या पत्नीवर प्रीती आहे परंतु तो तिला प्रथम स्थान देत नाही आणि तिच्याशी प्रितीने वागत नाही तर तो सिद्ध करत आहे की त्याची तिच्यावर खरोखर प्रीती नाही. जरी त्याला तिच्याबद्दल खूप आपुलकी वाटत असली तरीही त्याची जीवनशैली त्याच्या शब्दांना अर्थहीन बनवते.
देव कोण आहे आणि तो जे अभिवचन देतो त्यावरचा आपला भरवसा आपल्याला तो आपल्याकडून इच्छित असलेले जीवन जगण्यासाठी आवश्यक कारणे आणि सामर्थ्य देतो. बायबल सांगते की ह्या गोष्टी पवित्र आत्म्याद्वारे घडते आणि पवित्र आत्मा हा आपल्यासाठी हमी (पुरावा) आहे की आपण येशूचे आहोत आणि त्याच्या बलिदानामुळे आपण नीतिमान ठरले जात आहोत.
येशूवरील आपला भरवसा आपल्याला शुद्ध जीवन जगून आपण ख्रिस्ती म्हणून कोण आहोत हे सिद्ध करण्याची शक्ती प्रदान करतो. याचा अर्थ असा नाही की आपण परिपूर्ण होऊ, परंतु जर आपण ख्रिस्ती आहोत, तर देव आपल्याला परिपूर्ण करेल.
आणि जर आपण विश्वासयोग्य राहिलो, तर पुढच्या जीवनात आपण पूर्णपणे परिपूर्ण बनवले जाऊ.
येशू म्हणाला की आपण द्राक्षवेलीवरील फांद्यांसारखे आहोत. जेव्हा आपण त्याचे बनतो, तेव्हा वेलावरील फांदीप्रमाणे आपण त्याच्या जीवनात प्रवेश करू लागतो. त्याची मुळे आपल्याला अन्न देतात आणि वाढण्यास मदत करतात, सोबत देव आपली छाटणी करत असतो जेणेकरून आपल्याला चांगले फळ लागू शकेल. आपल्यामध्ये वाढणारे फळ आहे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.
जर आपले जीवन आपल्यासाठी आपल्या भरवस्याद्वारे येशूचे जीवन आणि मृत्यूमध्ये देवाच्या आत्म्याने बदलले आहे तर, आपल्या जीवनमध्ये झालेले बदल हा आपला विश्वास खरा असल्याचा पुरावा आहे. ही अभिवचने आपल्याला खात्री देतात की त्याच्या मृत्यूद्वारे त्याने जे काही साध्य केले ते आपले आहे.
आपण आत्म्याच्या फळाद्वारे वाचविले गेलो नाही. जर आपण इंद्रियदमनाचा सराव केला आणि शांती मिळवली, तर याद्वारे आपण वाचविले जात नाही. परंतु जर आपण निष्फळ जीवन जगत आहोत, तर आपण ख्रिस्ती आहोत का असा प्रश्न विचारला पाहिजे.
त्याचे रक्त पाणी आहे, आणि आपले जीवन फांद्या आहेत. मजबूत आणि परिपक्व होण्यासाठी पुत्राच्या प्रकाशात वेळ घालवा.
खोलवर पहा
यशया 52:13 - 53:12 वाचा, भविष्यवाणीचा एक भाग येशूच्या जन्माच्या सुमारे 700 वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. नंतर योहान 19:16-42 वाचा. या भागांबद्दल तुमचे विचार आणि प्रश्न लिहा आणि दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीसोबत सामायिक करा. तुम्हाला बरे करण्यासाठी येशू मरण पावला या कल्पनेचा तुमच्यावर भावनिक परिणाम कसा होतो?