पाठ 1
आमच्याकडे एक चांगली बातमी आहे. देव आपल्यावर प्रीती आणि क्षमा करण्याचे, आपल्याला न संपणारे जीवन देताना, वाईटापासून सुटका, आणि प्रीतीत जोपर्यंत आपण त्याजवर भरवसा ठेवतो आणि त्याची आज्ञा पाळतो तोपर्यंत त्याच्याबरोबर घनिष्ठ मित्रतेचे अभिवचन देतो.
तुमचा यावर विश्वास आहे का? तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला समजले का?
बायबल सांगते की आपण सदैव देवावर प्रीती करण्यासाठी, त्याचे आज्ञापालन करण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी जन्मलो आहोत,[2] परंतु आपण तसे करू शकत नाही.
का?
कारण आपण त्याच्यापासून दोन प्रकारे वेगळे होऊन जन्मलो आहोत.
प्रथम, आपण त्याला ओळखत नाही, आणि आपण ज्याला ओळखत नाही त्याच्यावर प्रीती करू शकत नाही.
दुसरे, आपण त्या वाईट इच्छा घेऊन जन्माला आलो आहोत ज्या आपल्याला देवाचे जीवन, त्याचे ज्ञान आणि त्याच्या प्रीतीपासून वेगळे करतात.[5] आपल्या वाईट इच्छा, मृत्यू, आजारपण, अन्याय, युद्ध-जीवनातील सर्व दुःखांचे कारण आहेत.
आपल्या वाईट इच्छा आपल्याला देवापासून वेगळे कशा राखतात?
वाईटाचे मूळ हा स्वार्थ आहे जो नातेसंबंधांना हानी पोहोचवतो. कोणी पुरुष जसजसा आपल्या पत्नीसह जवळीक साधतो, तसतसे त्याचे शब्द, कृती आणि विचार तिला कसे त्रास देऊ शकतात हे तो अधिक सहजपणे ओळखू लागतो. देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधातही असेच आहे. आपण देवाच्या जितके जवळ जातो, तितकेच आपल्याला समजून येते की आपल्या वाईट गोष्टी कशा प्रकारे त्याच्या जवळीकतेपासून दूर नेतात.
देवापासून आपण वेगळे झाल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती?
देवाने मानव बनण्याची निवड केली जेणेकरून तो आपल्याशी घनिष्ठ मैत्री पुनःस्थापित करू शकेल. तो पुरुष येशू होता.
देवाला मानव बनणे महत्त्वाचे का होते?
प्रथम, वैयक्तिकरित्या आपल्याशी संबंधित होण्यासाठी. दुसरे, आपला आनंद, वेदना आणि संघर्ष अनुभवण्यासाठी. तिसरे, आपल्या जागी मरण पत्करून आपल्या वाईटाची शिक्षा भोगण्यासाठी. आणि चौथे, आपले वाईट धुवून टाकण्यास पुन्हा जिवंत होण्यासाठी, आपली त्याच्याशी घनिष्ठ मैत्री होण्यासाठी आणि आपल्याला न संपणारे जीवन देण्यासाठी.
येशूने आपल्यासाठी मरण पत्करले आंशिक रूपाने हे सिद्ध करण्यासाठी कि देव वाईटाला शिक्षा करतो. आपल्याला असा देव नको आहे जो वाईटाला शिक्षा देत नाही. येशूचा मृत्यू या गोष्टीची हमी आहे की देव असे करणार नाही, कारण त्याने कोणतीही चूक केली नाही, तरीही त्याने आपल्या वाईटासाठी स्वतःला शिक्षा देणे पत्करले.
त्याचा मोठा उद्देश होता आपल्या वाईट इच्छांपासून आपल्याला मुक्त करणे आणि आपली अंतःकरणे बदलून टाकणे जेणेकरून आपण त्याच्याशी शुद्ध मैत्रीमध्ये जगू शकू. बायबलमध्ये याला “नवीन जन्म” असा उल्लेख आहे. याचा अर्थ पूर्णपणे बदलून जाणे, आपल्या वाईट इच्छांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन, देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंधात जगणे.
याचा अर्थ आहे कि चांगली बातमी येशूने आपली शिक्षा सोसल्यापर्यंतच सीमित नाही.
बायबल सांगते की येशू मेल्यानंतर, त्याला मेलेल्यांतून उठविले गेले आणि तो अजूनही जिवंत आहे. तो आपल्याला बदललेले जीवन प्रदान करत आहे: आपल्या भंग पावलेल्या जीवनासाठी त्याचे परिपूर्ण जीवन. जेव्हा आपण हा अविश्वसनीय प्रस्ताव स्वीकारतो, तेव्हा त्याचा आत्मा आपल्या आत राहू लागतो आणि हळूहळू आपल्या वाईट इच्छांची जागा त्याच्या चांगुलपणाच्या वाढत्या इच्छेने बदलून टाकतो.
आपल्याला स्वच्छ आणि परिपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला पवित्रीकरण म्हणतात. हे जीवन पूर्ण होईपर्यंत आपण परिपूर्ण नसतो. तथापि, प्रक्रिया लगेच व्यावहारिक परिणाम देते.
त्या परिणामांना आत्म्याचे फळ म्हणतात: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन. जर आपण ख्रिस्ती आहोत, तर आपण या गुणांमध्ये वाढत जाऊ. नाही तर, देवाला शरण जाण्याची आणि बायबलचे वाचन करून, वाईटापासून दूर राहून, प्रार्थना करून, आणि त्याची उपासना करून त्याच्या जवळ जाण्याची वेळ आली आहे.
आपण आत्म्याचे फळ वाढवू शकत नाही. केवळ पवित्र आत्माच असे करू शकतो जेव्हा आपण ख्रिस्तावरील आपली प्रीती व्यक्त करतो.
बायबल सांगते की आपण आपला वधस्तंभ उचलून येशूचे अनुकरण केले पाहिजे. हे वचन आपल्या स्वार्थाच्या मृत्यूचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे येशूने स्वतःचा वधस्तंभ (छळाचे साधन!) वाहून नेला, आणि त्यावर टांगून मरण पावला, त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वार्थाच्या मृत्यूद्वारे प्रतीकात्मकपणे तेच केले पाहिजे.
हे महत्त्वाचे का आहे? कारण आपल्या स्वार्थी इच्छा देवाच्या इच्छेशी युद्ध करत आहेत. येशूला पूर्ण समर्पण आणि भरवसा हवा आहे. तो सांगतो की आपण आपल्या स्वार्थी इच्छांना देवाच्या इच्छेसोबत बदलून टाकावे. हे देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या नम्र सेवेद्वारे आपली प्रीती दर्शविण्यासाठी आहे.
जेव्हा आपण समर्पण करतो आणि आपले एकमात्र समाधान म्हणून देवाची निवड करतो, तेव्हा तो आपल्याला त्याची आज्ञा पाळण्याची शक्ती आणि इच्छा देतो. हे त्याला आपण श्वास घेत असलेली हवा होऊ देण्यासारखे आहे. येशूला श्वासा सारखे आत घ्या. येशूला श्वासा सारखे बाहेर सोडा. असे पुन्हा करा. दररोज. मरेपर्यंत. याद्वारेच आपल्याला धैर्य मिळते हा भरवसा ठेवण्यासाठी कि जेव्हा तो आपल्याला आपल्या शत्रूंशी प्रितीने वागण्याची आज्ञा देतो, तेव्हा तो आपल्याला तसे करण्यास मदत करेल.
येशूबरोबरचे आपले नाते हे आपण अनुभवू शकणारे सर्वात जवळचे नाते आहे कारण त्याचा आत्मा आपल्या मध्ये आहे. जेव्हा तुम्ही प्रितीने देवावर भरवसा ठेवता आणि त्याचे आज्ञापालन करता तेव्हा हे नाते तुमचे जीवन बदलून टाकेल. मग, जेव्हा तुम्ही चुका कराल, तेव्हा तो तुम्हाला देवाचा सन्मान करण्यास मदत करेल.
तुम्ही विचार करत असाल की अशा प्रकारचे जीवन तुम्हाला सामान्य जीवनाचा आनंद घेण्यापासून रोखेल. आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की देवावर प्रीती केल्याने आणि त्याची आज्ञा पाळल्याने जीवनात देवाच्या शांतीचा आणि आनंदाचा आपण आनंद घेऊ शकू.
जरी आपण या जीवनात कधीही वाईट इच्छांपासून पूर्णपणे मुक्त नसलो, आणि आपण चुका करत असलो, तरीही येशूवरील आपली प्रीती आपल्याला वाईट इच्छांपासून दूर ठेवते ज्यामुळे त्यांची शक्ती क्षीण होऊन जाते. देव असे करतो म्हणून आपण त्याचा, जगाचा आणि त्याने आपल्याला शुद्धतेने दिलेल्या नातेसंबंधांचा आनंद घेण्यास मोकळे आहोत.
आपल्यापैकी बहुतेकांना विश्वास ठेवण्यास कठीण वाटणारे अभिवचन म्हणजे देव आपल्या इच्छा बदलतो. तो असे करतो. हे वास्तविक आहे. अन्यथा, चांगली बातमी, चांगली बातमी ठरणार नाही.
अनेक ख्रिस्ती लोक चांगले जीवन का जगत नाहीत?
प्रत्येक ख्रिस्ती वाईटापासून मुक्त जीवन जगू शकतो, परंतु असे काही क्षण असतात जेव्हा आपण त्यास नकार देतो. कधीकधी आपण ख्रिस्ती झाल्यानंतरही, येशूऐवजी वाईटाची निवड करतो.
काहींना वाईटापासून मुक्ततेचा अनुभव होत नाही कारण ते विश्वास ठेवत नाहीत की हे शक्य आहे किंवा देव ते देत आहे.[36] इतर लोक वाईटापासून मुक्त राहण्यास नकार देतात कारण असे करणे महाग आहे. कारण त्यासाठी देवाप्रती संपूर्णपणे, निरंतर समर्पणाची गरज असते.
याचा अर्थ काय आहे?
आपण देवाप्रती समर्पण केल्यावर, आपल्याला निरंतर समर्पणाची आज्ञा दिली गेली आहे. हे सतत घडणे आवश्यक आहे कारण आपण सर्वजण स्वार्थाकडे परत वळू शकतो. बायबल या प्रवृत्तीला पाप स्वभाव म्हणते. आपल्या जन्माच्या दिवसापासून ते मरेपर्यंत आपल्यामध्ये तो आहे.
जसजसा आपण देवावर विश्वास आणि भरवसा ठेवतो, वाईटापासून वळतो, प्रार्थना करतो, आराधना करतो, बायबल वाचतो, आणि इतर ख्रिस्ती लोकांसह समुदायात सामील होतो, तसतसा आपल्या आतील ख्रिस्ताचा आत्मा आपल्या इच्छा बदलू लागतो आणि आपल्याला पाप स्वभावापासून प्रगतीशील मुक्तता देतो.
वाढ होण्यास वेळ लागतो. प्रक्रियेत आशा गमावू नका. आणि कमी गतीच्या वाढीला अजिबात वाढ न होण्यासाठीचे निमित्त म्हणून उपयोग करू नका.
देवाचा सन्मान केल्याने मिळणारा शाश्वत आनंद आणि शांती या जगात सापडत नाही. वाईट हे वाईट आहे म्हणून आपण वाईटापासून वळत नाही; देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण वाईटापासून वळतो.
देव आपल्याला त्याच्या गौरवासाठी त्याच्या सोबत कार्य करण्यास बोलावत आहे. आपण त्याला समर्पित झाल्यानंतर, तो आपल्याला प्रेरित करतो ही सुंदर मैत्री इतरांसोबत सामायिक करण्यासाठी, ज्याला सुवार्ता प्रसार म्हणतात, आणि ती कशी अनुभवावी ते त्यांना शिकवण्यासाठी, ज्याला शिष्यत्व म्हणतात.
तो आपल्याला जे देतो ते इतके चांगले आहे की जेव्हा आपण ते अनुभवतो, तेव्हा आपण त्याच्याबद्दल सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. एकदा आपण आस्वाद घेऊन पाहिल्यानंतर की प्रभु चांगला आहे, आपल्याला साहजिकच इतरांना सांगावेसे वाटेल जेणेकरून ते आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आणि आनंद अनुभवू शकतील.
पुन्हा, ही चांगली बातमी आहे (सर्वोत्तम बातमी!): देव आपल्यावर प्रीती आणि क्षमा करण्याचे, आपल्याला न संपणारे जीवन देताना, वाईटापासून सुटका, आणि प्रीतीत जोपर्यंत आपण त्याजवर भरवसा ठेवतो आणि त्याची आज्ञा पाळतो तोपर्यंत त्याच्याबरोबर घनिष्ठ मित्रतेचे अभिवचन देतो. जर आपण आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत विश्वासयोग्य राहिलो, तर देव आपल्याला अभिवचन देतो एक नवे शरीर देण्याचे जे वाईट इच्छा, मृत्यू आणि निराशेच्या शापापासून पूर्णपणे मुक्त आहे, जेणेकरून आपण त्याच्याबरोबर सदासर्वकाळ राहू शकू.
वाईट बातमी अशी आहे की जो कोणी देवाचा प्रस्ताव नाकारतो त्याला अंतहीन शिक्षा आणि देवापासून वेगळेपणा भोगावा लागेल, जे आपण सर्वांनी आपल्या वाईटापासून कमावले आहे.
देवाची चांगली बातमी आणि जेव्हा आपण त्याला नाकारतो तेव्हा काय होते ही वाईट बातमी, आपल्या जीवनात सुवार्तेला सर्वात महत्त्वाचे सत्य बनवते.
आपण देवाचे गौरव करण्यासाठी आणि सदैव त्याचा आनंद घेण्यासाठी अस्तित्वात आहोत. आपण अनेकदा विचार करतो की आपल्याला स्वतःला प्रसन्न करणारे जीवन आणि देवाला प्रसन्न करणारे जीवन यापैकी एक निवडावे लागेल. सत्य हे आहे की वाईट इच्छा पूर्ण करून आपण फार काळ प्रसन्न राहू शकत नाही. वाईट गोष्टींमध्ये गुंतल्याने उदासीनता, आत्म-मूल्याची भंग भावना, आणि विध्वंस, वाईट वर्तनांचे व्यसन उत्पन्न होतात. वाईट आपल्यावर राज्य करते, आपल्यामधून आनंद घालवते, आणि आपल्याला पोकळ व एकटे करून सोडते. ते आपल्याला गुलाम बनवते.
जेव्हा आपण स्वतःला वाईटाचे गुलाम होण्याऐवजी देवाच्या चांगुलपणाचे इच्छुक सेवक म्हणून पाहणे निवडतो, तेव्हा आपल्या जीवनात देवाची उपस्थिती आणि त्याने आपल्याला सुवार्तेमध्ये अभिवचन दिलेल्या महान भेटवस्तू, आपल्याला तो आनंद आणि स्वातंत्र्य देतात जे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
सर्वकाही प्राप्त होते. आपल्या सर्व अवज्ञेच्या बदल्यात त्याची सर्व क्षमा, जीवन आणि प्रेमळ दयाळूपणा.
हे लक्षात ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तारणाची कविता:
क्रूसावर येशू, तू प्राण दिलास
पुन्हा उठलास, आम्हा तारावयास
माझ्या पापांची क्षमा कर
ये प्रभू ख्रिस्ता, माझा मित्र हो
बदल जीवन आणि नवीन कर
तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर
खोलवर पहा
योहान अध्याय 17 वाचा, जो येशूने मृत्यूपूर्वी थेट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेचा रेकॉर्ड आहे. येशूने जे म्हटले त्यामध्ये तुम्हाला रुचीपूर्ण वाटणारे कोणतेही तपशील लिहिण्याचा प्रयत्न करा, नंतर वाचा आणि तुमच्या प्रश्नांची दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीशी चर्चा करा. येशूने तुमच्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रार्थना केल्याबद्दल तुमचे काय मत आहे?